Thursday, 29 November 2018

माझा मित्र अनिल टंक
मॅट्रिक नांतर मी सावनेर ला शिकायला गेलो . मोठं भाऊ श्रीकांत तेव्हा सावनेर तहिसल ऑफिस मध्ये नाजीर म्हणून कामाला होता . १९६६ मंधे नव्याने स्थापन झालेल्या आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये मी बी कॉम फर्स्ट इयर ला ऍडमिशन घेतले . त्या कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर र त्र गोसेवाडे श्रीकांत दादा चे परिचितांचं नव्हते तर ते आमच्या गाव पवनी चे जावई सुद्धा होते . गोसेवाडे सरांचे सासरे म्हजें आज जे पावनीला प्रसिद्ध लक्समि - रामा संस्कृतक हाल पवनी बाजार जवळ आहे त्याचे मालक . पूर्वी यांचे कलाराचे मोठे दुकान बाजार जवळच होते . दोन माळ्याची हवेली , खाली पुढे दुकान आणि वर पाढीमागे रहाणे . शेती , साधन , प्रतिष्टीत कुटुंब म्हणून ओळखले जात . जातीने कलार म्हणून कलाराचे दुकान म्हणूनच परिचय .
गोसेवाडे सरांचे पवनी येणे जाणे राहत असे . सर पूर्वी धरमपेठ कॉलेज मध्ये इकॉनॉमिक्स चे प्राध्यापक होते , पुढे डॉक्टरेट करून आता ते सावनेर च्या नवीन आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते ,गोरेपान , उंच , मजबूत बांधा , उन्नत माथा , रुबाबदार चेहरा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते तर इकॉनॉमिक्स शिकविण्यात त्यांचं हातखंडा होता .
१९६६-६९ असे तीन वर्ष मी सावनेर ला श्रीकांत दादा बरोबर राहून शिकलो . दादाचे १९६६ मध्ये लग्न झाले होते वाहिनी नागपूर , इतवारी च्या सोमकुंवर कुटुंबातील . गरीब पण सोज्वळ कुटुंब . मी बरेचदा वाहिनी बरोबर त्यांच्या माहेरला गेलो . उत्तमोतला उत्तम पाहुणचार , उठबस करीत असत . वाहिनी चा भाऊ रेल्वेत गॅंग मन , मामा सुद्धा गॅंग मन . दोघेही सज्जन आणि वाहिनीची वाहिनी तर अतिशय चांगली . वाहिनी ला एक लहान बहीण होती . महा बडबडी .
दादा वहिनींनी मला मुलं प्रमाणेच सांभाळले . त्यांना एक मुलगी झाली . रेखा तिचे नाव . अतिशय लाडात वाढली . ते दिवस फारच रम्य होते !
सावनेर चे नौकरदार , चांगले लोक जे बाहेरून आले होते ते सावजी च्या चाळीत राहायचे . हि चाल सावनेर रेल्वे स्टेशन च्या ठीक सामने होती . तीन साईड ला सहा सहा ची ३० -३५ फुटी तीन खोल्याची परसात चाल . माहित चांगला ६० -७० चौरस फुटाचा ग्राउंड एका कोपऱ्याला विहीर आणि चाळीचे संडास .दोन्ही बाजूला छोट्या गेट .चाळीतले पोर ग्राउंड मध्ये बॅडमिंटन खेडयाची . चाल मालक सावजी चा सावनेर मध्ये मोठा दरारा होता . त्याची खूप प्रॉपर्टी होती . तो मोट्या कांब मिश्या ठेवायचा आणि मिशीला पीळ देत राहत असे . आमच्या चाळीत आम्ही , तहसील आफिस चा कुलकर्णी शापायी , टेलेफोन खात्यातील धांडे , अनिल टंक चे आई वडील , बहीण भाऊ , कडू पाटील चे शिकणारे मुलं , त्यांची पत्नी कडू पाटलीन बाई , त्यांचा नौकर , रेल्वे चे बाबू मेश्राम आमच्या कॉलेज थे प्राध्यापक इसाक , तिवारी , ठाकरे राहत असत .
ते दिवस लाल गुंजी चे होते . कंट्रोल मध्ये लाल गुंजी , अमेरिकेन गहू भेटत होते , खूप दुष्काळ पडला होता . इंदिरा गांधींनी तेव्हा लाल गुंजी , अमेरिकन , गहू , मका आयात करून लोकांना खायला घातले . असे ते जिकरीचे दिवस !
अनिल टंक चे वडील लाधुभाई रेड आकसायीड चे पुरवठादार , मायनींग चा पट्टा होता . आर्थिक सुस्थिती .अनिल चे घर आमचे घर आमने सामने , तो त्याचे वडील , आई , एक मोठा भाऊ एक लहान भाऊ व सरावात लहान बहीण . ते मूळचे गुजराती , आईला बा आणि वडिलांना बापू म्हणत . बापू लाधुभाई रेड आकसायीड चे रेल्वे ला पुरवठादार , खान पट्टा असेलेले. मी सुद्धा त्यांना बापू , बा म्हणायचो . मोठा भाऊ रमेश नुकताच खापरखेड्याला बी एस्सी करून लागला होता , अनिल , लहान भाऊ विनोद , लहान बहीण वनिता आठवीत शिकणारी असे हे त्यांचे सुखी कुटुंब ! २४ तासातून १८ तास अनिल आणि मी सोबत सोबतच . तो सुद्धा माझ्याच वर्गात . कॉलेज , फिरणे , मार्केट सर्व साथ साथ .
कॉलेज ला मी फार ऍक्टिव्ह होतो , वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून यायचा . माझे तेव्हाचे अजून काही कॉलेज मित्र होते ते म्हणजे विजय नाईक , मनोहर मोवाडे , गांधी . पण राऊत ,अनिल , विजय , मनोहर म्हणजे खास मैत्री आम्ही त्यांच्या शेतीवर जायचे , हुरडा खायचे , दोन सायकिली वर चार जण अशी आमची लांब लांब रपेट असायची . हे सर्व मित्र सधन , श्रीमंत घर ची . माझा अजून एक मित्र होता तो म्हणजे कापसे तो इसाक सरांना उलटे करून कसाई म्हणायचं . जवळ जवळ सर्व गाव मला आता कॉलेज चा होतकरू विध्यार्थी म्हणून ओळखत असे . गोसेवाडे सर म्हणायचे राऊत पोस्ट ग्रॅजुएट होऊन या याच कॉलेज ला प्राध्यापक व्हा . इकॉनॉमिक्स मध्ये मला जास्त गुणामुळे पारितोषिक मिळत असे . पुढे मी बी कॉम फायनल साठी नेवजाबाई हितकारिणी कॉलेज , ब्राह्म्हपुरी ला गेलो , एम कॉम साठी नागपूर ला जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर ला आलो , दुसऱ्या वर्षी मुंबई ला रेल्वे ऑडिट आफिस मध्ये कामाला लागलो . तेव्हा पासून जे सावनेर सुटले ते सुटले . सावनेर ला जाऊ शकलो नाही . वनिताचे नागपूरla लग्न झाले हाल वर तेव्हा पत्रिका अली होती , अनिल चे लग्न रायपूर ला झाले तेव्हा सहकुटुंब मी रायपूर ला गेलो होता . नंतर संपर्क झाला नाही . २००२ मध्ये मी त्याला पात्र लिहले त्याच्या बायकोने म्हणजे वहिनींनी लिहले ते बरेच वर्षय पूर्वी नागपूर सावनेर रोड असिसिडेन्ट मध्ये मरण पावले आणि त्यांना मुली आहेत , मोठ्या मुलीच्या लागणी नंतर पत्रिका आली . घराचा माणूस निघून गेला कि कशी वाईट अवस्था रडत रडत सांगितले तेव्हा मलाच रडू यायला लागले दोन हजार रुपये मी त्यांना दिले , अधिक असते तर अधिक दिले असते . आता मी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती .
दुःख एवढाच , मित्र अनिल , मी फार काही करू शकलो नाही !
नेटिविस्ट डी डी राऊत

Wednesday, 28 November 2018

ही माझी पवनी नगरी !
माझी पवनी नगरी , ही माझी सुंदर पवनी नगरी फार पुरातन आहे ती बुद्ध काळात होती , बुद्धा पूर्वी होती ,बुद्ध नंतर आज सुद्धा आहे ! बुध्दाच्या काळात इथे विहार बांधले गेले ,पवनी च्या महा जनपदाने ते बांधले .नालंदा , तक्षशीला सारखे येथे मोठे विद्यापीठ होते , बहुदा पदमपाणी , पद्मावती असे त्या वेळी नगरीचे नाव होते आणि नगरी च्या नावानेच विश्व विद्यालय होते . माझी नागरी पवनी एक महा जानपद असून बुद्ध पूर्वीच्या गं राज्यातील एक महत्वाचे गण राज्य होते . नागवंशी शिवाचे गण राज्य!
पवनी नागरी आज आहे त्या पेक्षा मोठी वसलेली असावी असे वाटते . आजची वाही , बेताला , शेलारी , खापरी डोंगरी , शेळी हा वैनगंगा नदीचा पूर्वेचा पत्ता पुरातन पवनी नगरीत येत असावा . या परिसरात , ताम्र पत्रे , खजिना , जमा , मुर्त्या , स्तूप , विहार , विद्या पिठाचे अवशेष दिसतात .
आज असलेला किल्ला व त्यातील भाग मोखाडा मोखाडा आजही सुस्थितीत , आखीव , रेखीव पद्धतीने बसविला दिसतो . आजचे तलाव बाल समुद्र , भाई तलाव , गाटा तलाव , चंडकाई तलाव , कुऱहाडा तलाव सर्व एके काळी सुंदर कमल पुष्पांनी भरलेले असत . हजारो पांढरे , गुलाबी, निळे , लाल कमळे बघून जीव हरखून जात असे .
माझ्या बालपणी आम्ही शुक्रवारी वार्डात राहत असू . किल्ल्याच्या अलीकडील सर्वात महत्वाची वस्ती . तिथे राहणारे सुद्धा लोक घरंदाज . घोडेस्वार , गजभिये , खापर्डे , खोब्रागडे , रामटेके , गोवर्धन , कामळे , मोटघरे , लोखंडे , नंदागवली , भाम्बोरे मधात राऊत नंतर मेश्राम , गजभिये , रामटेके अशी वस्ती म्हणजे शुक्रवारी वार्ड , लागूनच तेली मोहल्ला , एक दोन सुतारांचे घर , तीन चार माळी समाजाच्या भाजीपाला वाड्या, त्या नंतर कोष्टी मोहल्ला ,तोढे कुणबी , पारधी , चांभार , धनगर , खाटीक , लोहार अस्या वेवसायचे लोक वस्ती भाई टाकावा जवळ मुस्लिम मोहल्ला , नंतर परिटांचे एक दोन घर , काही कोमटी , दोन चार ब्राह्मण घर दीक्षित , वेव्हारे , देशपांडे . अनेक कडे शेती . तांदूळ, काठानी माल व्यापारावर शुक्रवारी तील महाराचा एकाधिकार ! महारातीलच काही बुंकर , धोतर , नऊवारी विणणारे , शेतकरी सधन. तट्टे , टोपली विणणारे पाच दहा कुटुंबाची टाळावा जवळ वस्ती त्यांचे जवळ कोळी समाजाचा बरेच घर असा हा पवनी गावचा वस्ती पसारा .
मी माझे बाल पणी एकटा तास अन तास पावनीच्या किल्ल्याच्या बुरुजाला टेकून सायंकाळचे आकाशातील बदलते रंग , बदलते ढग आकार बसून नहाळीत असे . सायंकाळी थेट बेटाला , वाही पर्यन्त फिरायला जात असे तर कधी आमराई , शेलारी नाल्या पर्यंत फिरून येई . कधी चंडकाई तर कधी घोडे घाट , पाते घाट , दिवाण घाट असे रोज चे फिरणे असे . तास दोन तास असे फिरण्यात जात आणि मग कधी बाळ समुद्रावरच्या बंधाऱ्यावर गवता वर लेटून नाही तर घाटा वरील राम मंदिराच्या विहिरीवर बसून किल्ला नाव्हळीत कसा वेळ जाई ते काळात नसे !
जसा जसा मोठा झालो तस तसा मी माझे गाव पवनी च्या अधिकाधिक प्रेमात पडलं गेलो . वनराई तील मोठा तलाव , पेरू संत्र्याचा बगीचा , लहान महादेव टेकडी असे परिसर वन भोजनाचे असायचे , शाळेच्या सहली जात . नदी ची सुंदर पांढरी वाळू , रेती , किती तरी रेतीचे महाल , किल्ले बनवून आणि नदी पात्रातील खरबूज , टरबूज चे शेत पेठे घालत पोहता येत नसले तरी उथड पाण्यात आडवे पडून घालविले तेव्हा नदी पात्र नितळ शुद्ध पाने वाहत असे खालचे दगड , मसोड्या , हाथ , स्पस्ट दिसत . असे माझे सुंदर गाव , सुंदर नगरी पवनी काही दिवसांनी माझ्याच नातेवाईकांनी म्हणजे स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत आणि गणपतराव खापर्डे यांनी बाल समुद्रा जवळ राम मंदिर टेकडी जवळ बुद्ध कालीन विहार शोधून काढले , सांची स्तूप पेक्षा मोठे ! आहे ना माझ्या पवनी नगरीची कमाल !
मी नौकरी निमित्य मुंबई ला आलो , कल्याण ला राहिलो पण सर्व लक्ष पवनी नागरी कडे , तिथे काय झाले ,काय चालले आहे. कधी वाटायचे नौकरी सोडून गावी जावे गाव सेवेला वाहून घ्यावे , गावाचा भाजीपाला , सुद्धा हवा , जंगल , वनराई मस्त फिरावे , ताज्या , भाजल्या मस्त मच्छी , भिरभुश्या , कारवाड्या, बारीक झिंगे , काटवे ,बोध , शिंगरा, वाघरा,तंबू , चाचे आणि चवळीची भाजी . आजून काय पाहिजे ? सोबत सिंगाडे , बोलांदे ,फातयी ,फुत्या , कचर , भिसी , चारोडी ,टेम्बार,देशी आंबे , खिरणी ओली , वळली आहेच ! ही माझी पवनी नगरी !
मंदिरांची नगरी , तलावांची नगरी , नदीची नगरी , विद्येची नगरी , स्तूपांची नगरी , विहाराची नगरी , जंगलाची नगरी , वाघाची नगरी , महादेवाची नगरी, नाग महा जनपदांची गणांची नगरी. कमळाची नगरी , पद्मावती , पदमपाणी पवनी !
आम्ही पवनी चे राऊत पूर्वी बहुदा हिंदू नाग वंशी असावे , पुढे बौद्ध झाले असावे , मध्यंतरीच्या काळात धर्मात्मा कबीर , बाबा फरीद यांचे मुराद राहिले असे दिसते . आज आमच्या घरी नाग मंदार समाधी आहे , नाग पूजा आहे , कबीर , बाबा फरीद सेवा आहे . आम्ही हिंदू आहोत . आमच्या घर जवळ खोदकाम केले तर ताम्र पत्रे , जमा मिळते , पैसे, मणी मिळतात . राऊत म्हणजे राज सैन्य . नाग मंदार या गण राज्याच्या , महा गण पदाचे आम्ही एक प्रमुख गण असावेत म्हणून आम्ही सर्व राऊत नाग मंदाराची पूजा करतो , नाग ठाणे घरी आहे ,लोक लहान मुलांसाठी राखोंडी घेऊन जात असत . आमची कुल देवता नाग मंदार आहे. आमचा पूर्वज नाग मंदार आहे .कबीरांना मानतो , बाबा फरीद मानतो !
आम्ही राज कुळातील असोन किव्हा नासोन पण आम्ही नाग वंशी आहोत , नाग परंपरा जपतो , नाग पंचमी , नाग मंदार पूजा हि आमची परंपरा आहे ! पवनी हि मात्र नाग वंशी गण राज्याची राजधानी , विद्येचे माहेरघर आणि सुखी लोकांची नगरी होती हे मात्र खरे !
नेटिविस्ट डी डी राऊत

Wednesday, 8 August 2018

९ अगस्त , २०१८ ,
विश्व नेटिव दिवस

जलावोगे तो राख बनूँगा
दफनावोगे तो खाक बनूँगा
फेंकोगे गर कूड़े में मुझे तो
नेटिविसम की खाद बनूँगा !

चाहे राख बनु या खाक बनु
उपजावु आग होगी मेरी
अंगारो पे चला जला हूँ मैं
फीनिक्स सी उडान है मेरी।

नेटिविज़्म की ज्योत है ये
सूरज से भी तेज आभा होगी
जहा ना रवि, कवी पुहचेगा
वो हर दर, मेरा दर होगा।

अलख जगाई नेटिविज़्म की
मैं मिटूंगा पर नहीं मिटेगा ये
विश्व में जहा मानव होगा
मै नेटिव अब ये नारा होगा।

नेटिविस्ट राउत का जन्मदिन
नेटिविस्ट दिवस माना जाएगा
९ अगस्त से २४ अगस्त अब
विश्व नेटिविज़्म पखवारा होगा।

#जनसेनानी #Jansenani कल्याण
९ अगस्त , २०१८ ,
#विश्व_नेटिव_दिवस